Wednesday, June 11, 2014

लोक काय म्हणतील?

"लोग मेरे बारे मे क्या सोचते है, अगर ये भी मै ही सोचू, तो फिर लोग क्या सोचेंगे."

कुठेतरी फ्रेम करून कायमचा लावावा असा विचार वाटतोय मला हा. 
हा काय म्हणेल.. तो काय म्हणेल.. ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल...
फाट्यावर मारावेत हे असले विचार. 
स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटेल ते ध्येय निश्चित करावे आणि त्याच्या दिशेने धावायलाच सुरुवात करावी. 
एकदा का लय गवसली की मग ना पायाला लागणारे खडे जाणवतात.. ना आजुबाजुची कुजबुज ऐकू येते.. ना परिणामांची चिंता जाणवते.. 
प्रत्येक श्वासागणिक जाणवतो तो फक्त आपण आपल्या ध्येयासाठी सर्वस्व देतोय या गोष्टीचा आनंद.
असा आनंद अनुभवणारे लोक नशीबवानच म्हणावे लागतील.

No comments:

Post a Comment